December 18, 2014
Labels: Chandrashekhar Gokhale, Charolya, Prem, Priyasi
Labels: Ektepana, Marathi Kavita
December 17, 2014
Labels: Aayushya, Marathi Prem Kavita, Priyasi, Tu, Tu Aani Me, Tujhyasathi
December 15, 2014
आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले गाव.
आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.
आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.
आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.
आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.
Labels: Aai
December 11, 2014
Labels: b, Chandrashekhar Gokhale, Charolya
December 9, 2014
December 8, 2014
Labels: Charolya, Maitri, Marathi Prem Kavita, Prem
December 5, 2014
माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात...
0 comments Posted by Piyush Tayade at Friday, December 05, 2014Labels: Aayushya, Chandrashekhar Gokhale, Charolya, Priyasi, Tu, Tu Aani Me, Tujhavina
December 4, 2014
December 3, 2014
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
0 comments Posted by Piyush Tayade at Wednesday, December 03, 2014Labels: Marathi Kavita
December 1, 2014
November 28, 2014
November 26, 2014
Labels: Nate
November 21, 2014
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस...
0 comments Posted by Piyush Tayade at Friday, November 21, 2014Labels: Pahela Prem, Prem, Priyasi, Tu
November 19, 2014
October 22, 2014
Labels: Diwali, Marathi Diwali Greeting
एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ
झाली !!
#MarathiKavitaBlog
Labels: Diwali, Marathi Diwali Greeting
October 21, 2014
Labels: Dhantrayodashi, Diwali, Marathi Diwali Greeting
Labels: Dhantrayodashi, Diwali, Marathi Diwali Greeting
October 20, 2014
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
http://www.baalpan.com/festival/vasubaras#sthash.X65KUMqy.dpuf
Labels: Diwali, Marathi Diwali Greeting
October 18, 2014
तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते
तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत
वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच
क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना.....
"श्वेता पोहनकर"
Labels: Bhet, Pahili Bhet, Prem, Priyasi
October 17, 2014
Labels: Dev, Jivan, Marathi Kavita
October 16, 2014
Labels: Prem
October 15, 2014
October 14, 2014
रुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा
गुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा
आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा
लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा
विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला
एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा
जेडी
October 9, 2014
Labels: Chandrashekhar Gokhale, Charolya
October 7, 2014
Labels: Tujhyasathi
October 6, 2014
Labels: Lagna
October 3, 2014
Labels: Dasara, Vijayadashmi
दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
0 comments Posted by Piyush Tayade at Friday, October 03, 2014Labels: Dasara
October 2, 2014
Labels: Dasara, Navratri, Vijayadashmi
Labels: Dasara, Vijayadashmi
Labels: Suvichar
October 1, 2014
खरच काही मुले असतातच असे,.
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...
मुले असतातच असे,.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
खरच काही मुले असतातच असे,.
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणार....
Labels: Marathi Prem Kavita, Prem, Priyasi
September 30, 2014
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही....
0 comments Posted by Piyush Tayade at Tuesday, September 30, 2014असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
@सचिन काकडे
Labels: Chandrashekhar Gokhale, Charolya, Hasya
September 29, 2014
September 26, 2014
Labels: Suvichar
महाराष्टातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन....
0 comments Posted by Piyush Tayade at Friday, September 26, 2014Labels: Navratri
September 24, 2014
September 19, 2014
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व ज्वलनशील पदार्थांवर आग पसरवणे ...
जोपर्यंत आजूबाजूला ज्वलनशील गोष्टी आहेत तोवर ठीक ...
पण एकदा त्या जळून गेल्या की मग काय ...
मग ते लाकूड स्वतः देखील त्या आगीत जळून खाक होतं ... आग शेवटी त्या लाकडाचीच राख करते ...
अहंकाराच अन अहंकारी माणसाचं पण काही तसंच आहे ...
ही अहंकाराची आग एकदा लागली की ती नाते-संबंध, विश्वास ह्या सगळ्याच गोष्टींत ठिणग्या पेटवून देते ...
सगळीकडे आग आपल्या 'कर्तृत्वा'मुळे लागलीये ह्या भ्रमात जगणाऱ्या अहंकारी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ...
की ह्या सगळ्या गोष्टी जळून खाक झाल्या नंतर ती आग शेवटी त्याच्या अहंकारासोबत त्याच्याच अस्तित्वाची सुद्धा राख करेल ...
बरं एकदाची जळून राख झाली तरी बेहत्तर ...
पण कधी कधी ती आग 'विस्तवा'च्या रूपाने कायम धगधगत राहते ...
आणि एकदाचं जळून खाक न होता हे असं कायमचं थोडं थोडं 'भाजत' राहणं जास्त त्रासदायक असतं !!!
Labels: Marathi Lekh
September 16, 2014
Labels: Chandrashekhar Gokhale, Charolya, Prem
September 11, 2014
Labels: Maitrin
September 10, 2014
Labels: Mann
September 9, 2014
Labels: Aathavan